मुंबई, दि. १४ (पीसीबी) – राज्याचा पुढील मुख्यमंत्री भाजपचाच असणार आहे. शिवसेनेची इच्छा असेल तर आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपदी बसवू शकतात. पण हा निर्णय पूर्णपणे शिवसेनेचा असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, पक्षाने गेल्या पाच वर्षात चांगले काम केले आहे. मला आज कोणतीही भीती वाटत नाही, कारण माझ्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्ष भक्कमपणे उभे आहेत. शिवसेनेकडून आम्हाला कोणताही त्रास नाही, ते आमचे मित्र आहेत. मित्राकडून कधी आपल्याला त्रास होतो का?, असा सवाल त्यांनी केला.
मी भाजपचा आणि शिवसेनेचाही मुख्यमंत्री आहे. हे युतीचे सरकार आहे, असे सांगून आदित्य ठाकरे काय करणार किंवा त्यांना कोणते पद दिले जाणार हा शिवसेनेचा निर्णय असेल. उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतल्यास आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होतील. तर राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत मात्र कोणताच संभ्रम नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.