मुख्यमंत्री फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा एकदा बंद दाराआड चर्चा

0
506

मुंबई, दि. २० (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा एकदा बंद दाराआड चर्चा झाली . गोदावरी अर्बन बँकेच्या उद्घाटनानंतर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या दोन दिवसात दोघांमध्ये दुसऱ्यांदा अशाप्रकारे  बैठक झाली आहे. दरम्यान या बैठकीतील तपशील अद्यापही समोर आलेला नाही.   

शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्या गोदावरी अर्बन बँकेच्या नरिमन पॉईंट येथील प्रशासकीय शाखेच्या उद्घाटनानिमित्त दोन्ही नेते एकत्र आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रशासकीय शाखेचे उद्घाटन झाले. त्यानंतर दोघांनी त्याच इमारतीतील एका हॉटेलमध्ये अल्पोपहार घेतला. तसेच सुमारे १५ मिनिटे चर्चा  केल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, दोघांमध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे अद्यापही समजू शकलेले नाही. सध्या विधीमंडळाचे  अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे, शिवसेनेने सभागृहात कोणती  भूमिका घ्यायची याबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर, उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला  अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट  महत्वाची मानली जात आहे.