कोल्हापूर, दि.१० (पीसीबी) – घटनेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजींनी गृहखात्यामध्ये लक्ष घालून, महिलांवरील वाढत्या आत्याचारांच्या घटनांवर नियंत्रण आणावे, यासाठी मागणी केली आहे. ट्वीट करत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे.
हिंगणघाटमधील पीडितेचा आज दुर्दैवी अंत झाल्याची बातमी ऐकून मन अतिशय उदास झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महिलांची ही स्थिती पाहून मन अतिशय अस्वस्थ होतंय. मा. मुख्यमंत्री उद्धवजींनी गृहखात्यामध्ये लक्ष घालून, महिलांवरील वाढत्या आत्याचारांच्या घटनांवर नियंत्रण आणावं.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 10, 2020