मुख्यमंत्री आणि उध्दवजीनी राष्ट्रवादीत प्रवेश केला – जितेंद्र आव्हाड

0
469

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – भाजप-शिवसेना पक्षप्रवेशाच्या सोहळ्यावर  राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी   खिल्ली उडवली आहे.  राष्ट्रवादीच्या  अनेक  नेत्यांचा भाजप-शिवसेनेत प्रवेश  पाहता दोन्ही पक्षांनीच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे, असे  आव्हाड यांनी म्हटले आहे.  भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या इतकी वाढली आहे की, तिथे नव्यांची संख्याच जास्त दिसायला लागली आहे. यावरून आव्हाड यांनी  एक किशा सांगत ट्विटरवरून  खोचक टोला  लगावला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे  की, मुख्यमंत्री आणि उध्दवजी केबिन मध्ये बोलत बसले होते अचानक झंम्प्या तिथे कुतुहलाने बघायला गेला. तिथे उदयनराजे भोसले, भास्कर जाधव,  गणेश नाईक, निंबाळकर, सचिन अहिर आणि इतरांना बघून तो ओरडत बाहेर आला, मुख्यमंत्री आणि उध्दवजीने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला म्हणून.

दरम्यान, साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे  खासदार उदयनराजे भोसले यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  यावर आव्हाड यांनी प्रहार केला आहे. उदयनराजे यांच्या आचरट बालिश चाळ्यांना शरद पवारांनी  पाठिशी घातले. तरीही उद्यनराजे यांनी जवळच्या माणसांना दुखावले, काय मिळाले?  असा सवाल  केला  आहे.