मुंबई, दि. ११ (पीसीबी) – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोलवसुली थांबवण्यास राज्य सरकारने स्पष्टपणे नकार देत टोलवसुली पूर्णपणे बंद केली जाणार नसल्याचे आज (मंगळवार) उच्च न्यायालयासमोर स्पष्ट केले. तसेच या महामार्गावर हलक्या वाहनांनाही सवलत दिली जाणार नाही, असे प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले.