‘मुंबईत बेस्ट सुरु, पुण्यात पीएमपीएमएल पूर्ण क्षमतेने सुरु. मग रेस्टॉरंट्स, हॉटेल्स का नाही?’; हॉटेल मालकांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

0
166

मुंबई,दि.२४(पीसीबी) : कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून सरकारने लॉकडाउनची घोषणा केली होती. मात्र याचा फटका छोट्यापासून मोठ्या उदयोगांना बसला. ‘अनलॉक चार किंवा मिशन बिगीन’ अंतर्गत अनेक उद्योग-व्यवसाय आतापर्यत सुरु झाले आहेत. पण हॉटेल व्यवसाय अजूनही पूर्ण क्षमतेने सुरु होऊ शकलेला नाही. महाराष्ट्रात हॉटेल व्यवसायावर आजही निर्बंध कायम आहेत. महाराष्ट्र सरकारने एक जूनपासून राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडायला परवानगी दिली. पण ही परवानगी फक्त पार्सल आणि होम डिलिव्हरीपुरतीच मर्यादीत आहे. हॉटेलमध्ये बसून खाण्यापिण्यावर अद्यापी बंदी कायम आहे.

अजूनहि हॉटेलमध्ये ‘डाइन इन सर्व्हीस’ म्हणजे ग्राहकांना हॉटेलमध्ये बसून खाण्यापिण्याची परवानगी नाहीये. तर अनेकांना आपली हॉटेल्स बंद करावी लागतील अशी स्थिती आहे. या अवघड परिस्थिती हॉटेल चालकांच्या विविध संघटनांनी यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या समस्येकडे लक्ष वेधले आहे. याबाबत इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

“सरकारने राज्य परिवहन सेवा, मुंबईत बेस्ट आणि पुण्यात पीएमपीएमएलला बस सेवा सुरु करण्याची परवानगी दिली मात्र अद्यापही हॉटेलवर निर्बंध ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही असे रेस्टॉरंट मालकांनी सांगितले. जर आम्हाला परवानगी मिळाली तर, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग या सर्व नियमांचे पालन करु असे रेस्टॉरंट चालकांनी आश्वासन दिले आहे.”