मुंबईत आमदार आशिष देशमुख यांची भेट घेणार – अजित पवार  

0
379

मुंबई, दि. २ (पीसीबी) – जनतेचा रोष सोडा, येथे आमदार-खासदार राजीनामे देत आहेत, शेतकऱ्यांवर हल्ले होत आहेत, समाधानी कोणीच नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी  दिली. राजीनामा दिलेले काटोलचे भाजप आमदार आशिष देशमुख  यांची मुंबईत आल्यावर भेट घेणार आहे, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.  

भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी आज राजीनामा दिला. त्याबाबत अजित पवार म्हणाले, सत्ताधारी पक्षातील आमदार राजीनामे देत आहेत. मग जनतेत किती रोष असेल, हे दिसून येत आहे. आमदार-खासदार राजीनामे देत आहेत. शेतकऱ्यांवर हल्ला होत आहे. येथे समाधानी कोणीच नाही. भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आशिष देशमुखांची मुंबईत आल्यावर भेट घेणार आहे, असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आशिष देशमुख आज (मंगळवार) वर्ध्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आज वर्ध्यात काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारणीच्या बैठक  होत आहे. तसेच काँग्रेसच्या वतीने आज वर्ध्यात जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे.