मुंबईतील ‘नाईट लाईफ’बद्दल अमृता फडणवीसांची लक्षवेधी प्रतिक्रिया

0
375

मुंबई, दि.२५ (पीसीबी) – आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई नाईट लाईफला २६ जानेवारीपासून मुंबईत सुरवात होत आहे. यामुळे मुंबईत हॉटेल, पब, मॉल, मल्टीप्लेक्स २४ तास सुरू राहणार आहेत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंबंधीच्या बोलावलेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

अमृता फडणवीस यांना पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमापूर्वी मुंबईतील नाईट लाईफबद्दल अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारले असता त्या म्हणाल्या की, ‘नाईट लाईफविषयी अजून काही विचार केलेला नाही. यात सुरक्षेचा प्रश्न कसा हाताळला जाईल हे पाहणे आवश्यक आहे. ‘महिला दिवस-रात्र येथे काम करतात. महिलांसाठी मुंबई सुरक्षित आहे. त्यामुळे मुंबईचा मला अभिमान वाटतो. मुबंईसारखे अनुकरण दुसऱ्या शहरांनीदेखील करावे,” असे अमृता फडणवीस म्हणाल्या.