मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा; हाय अलर्ट जारी

0
632

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर येत्या तीन महिन्यात दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा भारताच्या गुप्तचर यंत्रनेने दिला आहे. या पाश्वभुमीवर रेल्वेने सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली असून राज्यभर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

लष्कर – ए – तोयबाचे अतिरेकी समुद्रमार्गे मुंबईत घुसण्याची खात्रीलायक माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ला, आपटा येथे बसमध्ये सापडलेला बॉम्ब आणि कानपूर-भिवानी कालिंदी एक्स्प्रेस शौचालयातील दुर्घटना या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी केला आहे. गुप्तचर संघटनेच्या अहवालानुसार, येत्या तीन महिन्यांत मुंबई रेल्वे स्थानकांवर हल्ला होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे तीन महिन्यांसाठी मुंबईतील रेल्वे स्थानकांसाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.