नाशिक, दि. २२ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीचे पहिले दोन टप्पे पार पडले आहेत. या निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी नोंदवली आहे. त्यामुळेच विरोधकांचे धाबे दणाणले आहेत , मी काहीही बोललो की काँग्रेसला शॉक बसतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) येथे म्हटले आहे.
महायुतीच्या उमेदवारासाठी नाशिकच्या पिंपळगाव येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोदी बोलत आहेत.
मोदी म्हणाले की, आमच्या सरकारने दोन पटरींवर सरकार चालवले. सामान्य माणसाचा स्तर उंचावला तर दुसरीकडे तर एकवीसाव्या शतकात भारताचा स्तर वाढविण्यासाठी काम केले. देशात चार गावांच्यामध्ये एक वेलनेस केंद्र उघडण्यात येत आहे. तसेच आरोग्य केंद्र उभारण्यात येत आहेत. एकीकडे आम्ही प्रत्येक गरीबाचे बँकेत खाती उघडली. डिजीटल व्यवहारांसाठी लोकांना प्रोत्साहित केले जात आहे. तसेच पोस्टाच्या सेवांमध्येही सुधारणा केल्या आहेत.
नाशिक, जालना आणि वर्ध्यातील मल्टि लॉजिस्टीक पार्कमुळे व्यापाराला चालना मिळेल, यामुळे तरुणांना कामाच्या संधी मिळतील. समाजातील प्रत्येक घटनासाठी आम्ही काही ना काही केले. आदिवासी तरुणांसाठी एकलव्य शाळा सुरु केल्या आहेत. त्यांच्या खेळातील सहभागासाठी, हस्तकलेसाठी तसेच वन्यसंपत्तीचा योग्य वापर व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे मोदींनी सांगितले.