मावशीला आपल्या भाच्यावरच प्रेम झाले; अनं भाच्याशी लग्न करायचा हट्टच करू लागली

0
1912

शिकोहाबाद, दि.२० (पीसीबी) – तुम्ही सर्वानी ती गाजलेली ओळ नक्कीच ऐकली असेल कि, ‘प्रेम आंधळं असतं’. प्रेम कधीही, कोणावरही, कोठेही होऊ शकत. जेव्हा एखाद्यावर प्रेम होत तेव्हा रंग, रूप, जात, धर्म, नातं काहीच पाहता येत नाही किंवा त्याचा विचार येत नाही. अशीच एक घटना घडली आहे ज्यामध्ये मावशीला आपल्या भाच्यावरच प्रेम झाले. मावशीला इतकं प्रेम झालं कि, तिने नातं आणि लाज सोडून भाच्याशी लग्न करायचा हट्टच करू लागली. त्याचा परिणाम असा झाला कि कुटुंबाला पंचायतीपासून पोलीस स्टेशनच्या चकरा माराव्या लागल्या.

नेहा हि शिकोहाबाद येथील एका एरियामध्ये आपल्या मोठ्या बहिणीकडे राहत होती. नेहाचं आयुष्य जास्तकरून बहिणीकडे गेलं आहे. तुम्ही असं देखील म्हणू शकता कि ती आपल्या बहिणीकडे लहानाची मोठी झाली आहे. नेहाच्या बहिणीला एक मुलगा आहे जो नेहाचा देखील सख्खा भाचा लागतो. एकाच घरात राहत असल्याने मावशीवरच त्याचे प्रेम जडले आणि तिचे देखील. या प्रेमात नेहा इतकी वेडी झाली कि तिला त्याच्याशी लग्न करायचा हट्टच करू लागली. नेहाच्या मोठ्या बहिणीने आपल्या मुलाचे लग्न जमवले तेव्हा नेहाने तिला आप्लयामांतील सांगितलं.

कुटुंबात याची बातमी पसरताच गोंधळ उडाला आणि थेट पोलीस ठाण्यात हे प्रकरण गेले. नेहाच्या घरच्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये खूप वेळ चर्चा झाल्यानंतर पोलिसांनी आपापसात वाद मिटवण्याचा सल्ला दिला. हे काही पहिलं प्रकरण नाही कि कोणी नातं न पाहता प्रेम केलं अश्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेकजण तर सुरवातीला कसलाही विचार न करता प्रेम करतात आणि नंतर अंगावर आल्यावर डोक्याला हात लावतात. काहीजण तर आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलतात. त्यामुळे प्रेम करण्यापूर्वी समाजाचा विचार करावा किंवा शेवट्पर्यंत प्रेम निभवावे.