मावळ मतदारसंघात शिवसेनेत अस्वस्थता आणि शिरूरमध्ये उत्सुकता; युतीचे घोडे अडल्याने पिंपरी-चिंचवडचे राजकारण संभ्रमावस्थेत

0
558

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – युती झाली आणि मावळ मतदारसंघात शिवसेनेकडून श्रीरंग बारणे पुन्हा उमेदवार असतील, तर आम्ही काम करणार नसल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. भाजपच्या जुन्या निष्ठावन पदाधिकाऱ्यांनी टाकलेल्या या गुगलीने शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. दुसरीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपने असा पवित्रा न घेतल्याने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. परंतु, राष्ट्रवादीकडून मैदानात कोण उतरणार याबाबत मात्र शिवसेनेसोबतच शिरूर मतदारसंघातील राजकीय वर्तुळात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच युतीचे चित्र स्पष्ट होत नसल्याने पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात काहीशी अस्थिर व संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.