मायावतींनी लग्न करावे, म्हणजे कुटुंब काय असते त्यांना समजेल-आठवले

0
579

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – मायावती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वक्तव्य करत आहेत. मात्र मायावतींनी लग्न केले नाही त्यामुळे कुटुंब काय असते त्यांना ठाऊक नाही. त्यांनी लग्न करावे मग त्यांना घर, कुटुंब कसे सांभाळले जाते याची जाणीव होईल असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. मायावती यांनी लग्न केले तर त्या मोदींबाबत बोलू शकतात असेही आठवले यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील भेलुपूर या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली.

राजकीय फायद्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच्या पत्नीला सोडले, ते महिलांचा सन्मान कसा करणार? असा प्रश्न विचारत मायावतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. याच टीकेला रामदास आठवले यांनी उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लग्न झाले आहे. त्यांची पत्नी शिक्षिका आहे. मायावतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यक्तीगत टीका करायला नको होती असेही आठवले यांनी म्हटले आहे.