Maharashtra

माझ्यामुळे मोदींनी कलम ३७० रद्द केले; राखी सावंतचा अजब दावा

By PCB Author

August 10, 2019

मुंबई, दि. १० (पीसीबी) – काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याच्या निर्णयावर अभिनेत्री राखी सावंतने अजब दावा केला आहे. हा मुद्दा सर्वात आधी आम्ही उचलून धरला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आमचे ऐकल्याबद्दल  त्यांचे आभार!, असे राखीने म्हटले आहे.    

मोदी सरकारने  कलम ३७० रद्द केल्यानंतर राखी सावंतने  मोदी यांचे अभिनंदन आणि आभार मानण्यासाठी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

मोदीजी धन्यवाद, काश्मीर आपले झाले आहे. मला तुमचा अभिमान आहे. तुमच्यासारखे कोणी नाही. कलम ३७०वर आधारित चित्रपटात मला भूमिका दिल्याबद्दल दिग्दर्शक, निर्मात्यांचे आभार. काश्मीर व कुलूमध्ये चित्रपटाचे पूर्ण चित्रीकरण झाले आहे.  माझे ऐकून तुम्ही ३७० रद्द केले, यासाठी मोदीजी धन्यवाद, माझे ऐकल्याबद्दल तुमचे आभार,  असा दावा या व्हिडिओत राखीने केला आहे.