नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – माझे सरकार कोणत्याही रिमोट कंट्रोलवर चालत नव्हते. मी पंतप्रधानपदी असताना सरकार आणि काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नव्हते, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केले आहे. राफेल कराराची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशीची मागणी आम्ही केली. मात्र, सरकार यासाठी तयार नाही. यावरुनच ‘दाल में कुछ काला’आहे, असा टोला त्यांनी मोदी सरकारला लगावला.