नवी दिल्ली,दि.९(पीसीबी) – भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी सर्वच एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाला बहुमत मिळताना दिसत असलं तरी भाजपच दिल्लीत सत्तेवर येणार आहे. सर्व अंदाज खोटे ठरणार असून भाजपला ४८ जागा मिळणार आहेत. माझं हे ट्विट सेव करून ठेवा, असं म्हटलं आहे.
भाजप दिल्लीत ४८ जागा जिंकून सरकार स्थापन करेल. पण कृपा करून आतापासून ईव्हीएमचा बहाणा शोधू नका, असं तिवारी यांनी म्हटलं आहे.
ये सभी एग्ज़िट पोल होंगे fail..
मेरी ये ट्वीट सम्भाल के रखियेगा..
भाजपा दिल्ली में ४८ सीट ले कर सरकार बनायेगी .. कृपया EVM को दोष देने का अभी से बहाना ना ढूँढे..🙏— Manoj Tiwari (@ManojTiwariMP) February 8, 2020
दिल्लीत ७० जागांसाठी आज मतदान पार पडलं. बहुमतासाठी अवघ्या ३६ जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या ११ फेब्रुवारी रोजी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेले आहे.