मागासवर्ग आयोगावर राज्य सरकारचा दबाव; राधाकृष्ण विखे-पाटलांचा आरोप

0
526

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – मागासवर्ग आयोगावर  राज्य सरकारचा दबाव होता, असे सांगून आरक्षणाबाबात सरकार वेळकाढूपणा करत आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (रविवार) येथे केला. मराठा, मुस्लिम, धनगर आणि लिंगायत समाजासोबत सरकारची ठकबाजी सुरु असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला.