Desh

महिला आणि लहान मुले नसते तर २ तासात शाहीन बाग रिकामं केलं असतं – मनोज तिवारी

By PCB Author

February 05, 2020

नवी दिल्ली,दि.५(पीसीबी) – भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी शाहीन बागमध्ये महिला आणि लहान मुले आहेत. ते नसते तर आम्ही २ तासात शाहीन बाग रिकामं केलं असतं, असं अस वक्तव्य केल आहे. लहान मुले आणि महिलांना हात लावणे आमची संस्कृती नाही, असं मनोज तिवारी म्हणाले आहेत.

दिल्लीतील शाहीन बागमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात गेल्या महिन्याभरापासून महिलांचं ठिय्या आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मनोज तिवारी यांनी भाष्य केलं आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्द्यांविरोधात देशात अशांतता आणि अस्थिरतेचं वातावरण आहे. अनेक लोक याविरोधात निदर्शने करत आहेत. मात्र, भाजपने सीएएला विरोध करणाऱ्यांवर टीका केली आहे.