Maharashtra

“महाविकास आघाडीचे १०० दिवस पूर्ण झाले की १०० अपराध?”

By PCB Author

March 07, 2020

मुंबई,दि.७(पीसीबी) – महाविकास आघाडीचे १०० दिवस पूर्ण झाले की १०० अपराध? असा सवाल करत भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महाराष्ट्र राज्याचा २०२० चा अर्थसंकल्प सादर केला. अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरुन विरोधी पक्षाने महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडीला आज १०० दिवस पूर्ण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, सरकारचे १०० दिवस पूर्ण झाले की १०० अपराध पूर्ण झाले याचे चिंतन करण्याची गरज आहे, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पाला ‘अर्थ’ नव्हता. अधिकाऱ्यांनी लिहून दिले आणि अर्थमंत्र्यांनी वाचले असा हा अर्थसंकल्प होता, अशा शब्दात सुधीर मुनंगटीवार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.