महाविकास आघाडीचं सरकार टिकणार नाही,हे सरकार महाराष्ट्राच्या भल्याचं नाही – नितीन गडकरी

0
401

मुंबई,दि.२२(पीसीबी) – महाविकास आघाडीचं सरकार टिकणार नाही. जी आघाडी झाली आहे ती सिद्धातांच्या आधारांवर झालेली आघाडी नाही त्यामुळे हे सरकार स्थापन झाले तरीही फार काळ टिकणार नाही असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.

शिवसेना आणि काँग्रेस हे दोन वेगळ्या विचारसरणीचे पक्ष आहेत. भाजपा आणि शिवसेनेची युती हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर झाली होती. मात्र महाराष्ट्रात आत्ता होऊ घातलेली महाविकास आघाडी ही संधीसाधू राजकारणाचे उदाहरण आहे अशीही टीका गडकरींनी केली आहे.

हे तिन्ही पक्ष वेगवेगळे आहेत. त्यांची विचारसरणी वेगळी आणि भिन्न आहे. शिवसेना ज्या विचारधारेवर चालते त्या विचारधारेला काँग्रेस पूर्णत: विरोध करते. काँग्रेस ज्या विचारधारेवर चालते ती विचारधारा शिवसेनेला मान्य नाही. आणि राष्ट्रवादीचा देखील शिवसेनेच्या विचारधारेला विरोध आहे. विचाराच्या आधारावर ही युती झालेली नाहीये, असं गडकरी म्हणाले आहेत.