Maharashtra

महाराष्ट्राने एका नव्या पायंड्याची सुरुवात केल्याचा अभिमान

By PCB Author

February 11, 2020

मुंबई, दि.११ (पीसीबी) – दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. दिल्लीमधील मतदारांनी भाजपाला पुन्हा एकदा नाकारलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिल्लीमधील निकालावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राने एका नव्या पायंड्याची सुरुवात केल्याचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. अहंकारी लोकांना दिल्लीकरांनी नाकारले आहे. अंहकाराला कोणीच समर्थन देऊ शकत नाही अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.