महाराष्ट्रात विठ्ठल दोनच, एक म्हणजे शरद पवार आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे – संजय राऊत

0
433

मुंबई,दि.२७(पीसीबी) – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात शरद पवारांच्या उपस्थितीत आव्हाड यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत बोलत होते.

“बाळासाहेब आणि शरद पवार यांनीच चाळीतल्या पोरांना मंत्री बनवलंय. महाराष्ट्रात विठ्ठल किती दोनच. एक म्हणजे शरद पवार आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

मी कार्यक्रमाला येताना खूप बॅनर पाहिले. त्यावर भीष्म पितामह असं लिहिलं होतं. मला वाटतं यात काही गैर नाही. मी नेहमीच असे संदर्भ देत आलेलो आहे. कारण पवार आणि बाळासाहेबांनीच चाळीतल्या पोरांना मंत्री बनवलंय, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.