महाराष्ट्रात मोदी-शहांसारखे गुंड नाहीत, त्यामुळे फडणवीसांना घाबरायचे नाही – हार्दिक पटेल

0
577

सांगली, दि. १६ (पीसीबी) – मोदी, फडणवीसांनी धनगर समाजाला केवळ आश्वासने देऊन फसवणूक केली आहे. त्यामुळे आता जर ते ऐकत नसतील तर त्यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे, असे पटेल आरक्षणाचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. येथे येण्यापूर्वी फडणवीस हे खूप ताकदवान असल्याचे आपल्याला सांगण्यात आले होते. मात्र, त्यांना घाबरण्याचे कारण नाही, कारण महाराष्ट्रात मोदी-शहांसारखे गुंड नाहीत, अशी बोचरी टीका त्यांनी केली.