मुंबई, दि. २२ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपाचाच होणार, असे महाराष्ट्र भाजपाच्या प्रभारी सरोज पांडे यांनी आज (शनिवार) येथे म्हटले आहे. पांडे यांच्या विधानामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून जुंपणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या नेत्यांची बैठक मुंबईत झाली होती. यावेळी बोलताना भाजपाचाच मुख्यमंत्री होणार, अशी घोषणा सरोज पांडे यांनी केली आहे.
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे, विनोद तावडे, सरोज पांडे, खासदार पूनम महाजन यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.दरम्यान, याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विचारले असता मुख्यमंत्री कोण होणार हे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे ठरले आहे असे सूचक उत्तर दिले आहे.