Maharashtra

महायुतीला २०० जागा मिळणार नाहीत – मनोहर जोशी

By PCB Author

October 21, 2019

मुंबई , दि. २१ (पीसीबी) –  विधानसभा निवडणुकीत महायुतीला  २००  जागा मिळणार नाहीत, असे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी  म्हटले आहे.  त्यांनी मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावला, त्यावेळी ते बोलत होते.

मी शिवसेना प्रमुखांच्या विरोधात कधीही बोलत नाही. त्यामुळे सांगतो की, यावेळी राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे. आदित्य ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मनोहर जोशी म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना महत्त्वाचे पद मिळणार हे निश्चित आहेत. मात्र त्यांना कोणते पद मिळेल, हे योग्यवेळी समजेल.

भविष्यात आदित्य ठाकरे मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतील. लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे की निवडून आलेला व्यक्ती कोणत्याही पदावर जाऊ शकतो. त्यामुळे मला विश्वास आहे की, आदित्य ठाकरे सुद्धा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास  जोशी यांनी व्यक्त केला आहे.