महाभारत युद्ध ‘कुरुक्षेत्रा’वरच का लढल गेलं? हे आहे यामागील कारण…

0
427

महाभारताचे युद्ध हे अतिशय मोठे युद्ध होते. जे कौरव आणि पांडवांमध्ये लढले गेले. नीती-अनीती, औरस-अनौरस ह्या मधील हा वाद होता. अखेर श्रीकृष्णाच्या मदत आणि मार्गदर्शनाने आणि पांडवांच्या शौर्याने विजय शेवटी सत्याचाच झाला. पण ह्या युद्धामध्ये अपरिमित हानी झाली. मोठ्या प्रमवावर जीवितहानी झाली. या युद्धमुळे अनेक संसार अर्धवट राहिले. कौरवांचा अनाचार व अधर्म नष्ट होण्यासाठी व परत धर्माची स्थापना होण्यासाठी हे युद्ध होणे आवश्यकच होते, म्हणूनच युगपुरुष, योगेश्वर श्रीकृष्णाने ह्या युद्धाची कथा लिहिली होती. भगवान श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली हे युद्ध लढले गेले.

कारण त्यांना माहित होते कि,’धर्माचे व सत्याचे नेहमीच आचरण करणारे पांडव त्यांच्याच भावांवर व नातलगांवर शस्त्र चालवण्यास कधीही धजावणार नाहीत.आणि त्यांच्या मनात किंतु परंतु निर्माण होईल. मात्र जर अशा वेळी पांडवांनी शस्त्र खाली ठेवले असते तर धर्माची स्थापना झाली नसती, कौरवांचे धर्माविरुद्ध व नीतीच्या विरुद्ध वागणे, प्रजेचे हाल करणे थांबले नसते.’आणि म्हणूनच अधर्माचा विजय होऊ नये म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला तो द्विधा मनस्थितीत असताना भगवद्गीता सांगून मार्गदर्शन केले. कारण भगवान श्रीकृष्णाचा हेतू होता कि, आसुरी प्रवृत्तीला युद्धाच्या माध्यमाने नष्ट करणे. तेव्हाच प्रजा सुखी होईल अन्यथा सर्वकाही नष्ट होऊ शकते. हे युद्ध केवळ दोन कुटुंबातील आपापसातील युद्ध नव्हते. तर हे धर्म-अधर्म ह्यांच्यामधील युद्ध होते. म्हणूनच हे युद्ध लढण्यासाठी वातावरणात क्रोध आणि द्वेषाच्या लहरी असणे आवश्यक होते.

जेव्हा युद्धासाठी जागा शोधण्याचे काम सुरु झाले.तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांचे दूत चारही दिशांना पाठवले. ह्या दूतांना आदेश दिले कि, ‘जिथेजिथे जाल तेथील घटना त्यांनी परत येऊन श्रीकृष्णांना सांगायच्या!’ एका दूताने आल्यावर खूपच भयानक घटना सांगितली जी कुरुक्षेत्राच्या जागरवर घडली होती. आणि या जागेची निवड या घटनेमुळे श्रीकृष्णाने युद्धासाठी कुरुक्षेत्राची निश्चित केली. त्या दूताने सांगितलेली घटना अशी होती कि,’दूत ज्या वेळी त्या ठिकाणी गेला, त्या दिवशी निसर्गाचे अत्यंत भयंकर रूप त्याने पहिले. अतिशय जोरात पाउस पडत होता. तेव्हा त्या ठिकाणी एका ठिकाणी एकाने आपल्या लहान भावाला सांगितले की, “जोरात पाऊस सुरु झालाय त्यामुळे जा आणि शेतातील पिकांचे पावसामुळे व पुरामुळे नुकसान होऊ नये म्हणून शेतावर लगोलग बंधारा घाल.” यावर लहान भावाने मोठ्या भावास असं करायला नकार देत उलट प्रश्न केला कि, “तू सांगितलेले काम करायला मी तुझा नोकर आहे का?” लहान भावाचे ते उर्मट बोल ऐकून मोठ्या भावाचा राग अनावर झाला आणि त्याने रंगाच्या भरात सुरा भोसकून लहान भावाची क्रूरपणे हत्या केली.एवढ्यावरच न थांबता पुढे त्याने त्याचे शव पायांच्या दिशेने पकडून फरपटत शेतातील बंधाऱ्याच्या दिशेने आणले व ज्यादिशेकडून पाणी वाहत होते त्या ठिकाणी त्याचे शव पायाने अक्षरश: ठेचून त्या ठिकाणी बसवले.’ आणि हि घटना ज्या ठिकाणी घडली तिचे नाव होत ‘कुरुक्षेत्र’.हि घटना पाहून दूताला धक्का बसला व तो थेट श्रीकृष्णांकडे आला. जेव्हा श्रीकृष्णांनी ह्या हत्येची बातमी ऐकली तेव्हा त्यांनी निश्चय केला की, ही जागा भावा भावांमधील युद्धासाठी योग्य आहे. कारण असे कि, ह्या ठिकाणी ज्या तामसिक लहरी निर्माण झाल्या आहेत त्यांचा मेंदूवर प्रभाव पडेल व कौरव –पांडव ह्यांच्या मनात एकमेकांविषयी प्रेमाची भावना पुन्हा निर्माण होऊ शकणार नाही. शिवाय युद्धात होणारी हानी बघून समझोता करण्याचा विचार सुद्धा ते करणार नाहीत.

आणि त्यामुळे कालांतराने जे युद्ध झाले तेव्हा हे युद्ध करणाऱ्यांनी आपापसातील कुठल्याच नात्याचा मान ठेवला नाही. समोरच्याच्या त्रासाचा, आनंद याचा विचार केला नाही. एकाच कुटुंबातील असूनहि त्यांनी अत्यंत भयंकर आणि निर्दयीपने एकमेकांना संपवले. एकीकडे शिष्य गुरुचा वध करण्याची वाट बघत होते तर दुसरीकडे भाऊ भाऊ एकमेकांच्या जीवावरती उठले होते. मात्र तरीसुद्धा एक वेळ अशी आली कि, एका क्षणी जेव्हा अर्जुनाच्या मनात दया निर्माण झाली आणि युद्धात आपल्याच गुरूंवर, काकांवर, भावांवर, भावांच्या पुत्रांवर म्हणजेच आपल्याच लोकांवर शस्त्र चालवण्यापेक्षा आपण संन्यास घेऊन निघून जावे. आपल्याला सत्ता ,राज्य काहीही नको असा विचार त्याच्या मनाला स्पर्श करू लागला. अर्जुनासमोर इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती उभी राहिली. आणि याच वेळी श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनीची चिंता ओळखली आणि त्याला भगवद्गीत्याच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.भगवान श्री कृष्ण म्हणाले कि, ‘धर्माच्या स्थापनेसाठी आपल्याच लोकांवर आपण वार केला तर ते पाप कधीच ठरत नाही आणि सामान्य मनुष्य हा फक्त त्याचे प्रारब्ध व संचित ह्या गोष्टींमुळे त्याच्या वाट्याला आलेले आयुष्य जगत असतो. कारण त्याची कृती ही त्याच्या हातात नसून नियतीच्या व परमेश्वराच्या हातात असते.’ हे ऐकल्यावर अर्जुनाने कुठलाही प्रश्न, शंका मनात न ठेवता युद्ध करावे व धर्माची स्थापना करण्यास हातभार लावला.आणि अखेर या धर्मयुद्धात धर्माचा विजय झाला आणि कुरुक्षेत्राची भूमी ह्या सर्व घटनांची कायमची साक्षीदार ठरली.