‘महापालिकांच्या निवडणुकीची लगीनघाई सुरू… राज्यातील १० महापालिकांच्या आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर !’

0
367

मुंबई, दि.१८ (पीसीबी) : राज्यातील निवडणुकांची लगीनघाई आता सुरू झाली आहे. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती व नागपूर या दहा महानगरपालिकांची मुदत येत्या मार्च-एप्रिल महिन्यात संपत आहे. त्यामुळे या महापालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यासाठी प्रभाग रचना व आरक्षण निश्चितीचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी जाहीर केले आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या 22 ऑक्टोबरला, उल्हासनगरसाठी 26 ऑक्टोबर तर नाशिकसह उर्वरित महानगरपालिकांसाठी 28 ऑक्टोबरला सोडत जाहीर होणार आहे. आरक्षण सोडतीनंतर प्रभाग रचना आणि आरक्षणाबाबत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. तसे सहारिया यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व महानगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेला 22 ऑक्टोबर पर्यंत मान्यता देणार आहे. त्यानंतर संबंधित तारखांना महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाबाबत सोडत काढण्यात येणार आहे.

आरक्षण आणि प्रभाग रचनेबाबत मुंबईसाठी 5 ते 20 ऑक्टोबर, तर उर्वरित महानगरपालिकांसाठी 10 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत संबंधित महानगरपालिकेमध्येच हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यावर राज्य निवडणूक आयुक्त किंवा त्यांनी प्राधिकृत कलेले अधिकारी 22 नोव्हेंबर पर्यंत सुनावणी देणार आहेत. मुंबई महानगरपालिकेसाठी 22 नोव्हेंबर पर्यंत सुनावणी देण्यात येईल. 28 नोव्हेंबरला मुंबईची तर उर्वरित महानगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना 28 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले जाईल .