Maharashtra

महाआघाडीत इतर पक्षांसाठी  ५० जागा सोडा – राजू शेट्टी

By PCB Author

September 29, 2019

सांगली, दि. २९ (पीसीबी) –  काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीत इतर पक्षांसाठी  ५० जागा देण्यात याव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.  

शेट्टी म्हणाले की, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले राधानगरी, चंदगड, मिरज, जत, आणि खानपूर या जागा देण्याची मागणी केली आहे.  बहुजन विकास पक्ष, शेकाप, प्रहर या संघटनांशी चर्चा करण्यात आली आहे. विविध संघटना या  ५० जागा वाटून घेणार आहेत. ज्यात कोणतेही मतभेद नसतील, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

तसेच भाजप आणि शिवसेना विरोधात मोर्चेबांधणी केली आहे. कोल्हापूर मधील शिरोळ, हातकणंगले आणि चंदगड तर सांगलीतील मिरज जत आणि खानापूर येथील जागांसाठी स्वाभिमानीकडून मागणी करण्यात आली आहे. सध्या रविकांत तुपकर यांनी राजीनामा दिल्याने हंगामी स्वरूपात कोल्हापूरचे अध्यक्ष जालिंदर पाटील प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.