‘मला वाटते जे घडायचं होते, ते घडले, जायचे ते लोक गेले’

0
412

औरंगाबाद, दि.१४ (पीसीबी) – ‘पुलवामा हल्ल्यात जे शहीद झाले, त्यांचे दुर्दैव’ जायचे ते लोक गेले. नवे सरकार स्थापन झाले,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल. औरंगाबादमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना ते बोलत होते. यावेळी त्यांना पुलवामा हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले. त्या हल्ल्याबद्दल आज काय वाटतं?, असा प्रश्न राज यांना पत्रकारांनी विचारला.

बोलताना ते म्हणाले, ‘ काय बोलणार त्याच्यावर आता? जे शहीद झाले त्यांचे दुर्दैव. तो हल्ला घडवून आणला आहे, अशी त्यावेळची चर्चा होती. तसे काही पुरावे समोर आले होते. जवानांना त्या मार्गाने घेऊन जाऊ नका, अशा सूचना असतानाही तरीही त्याच रस्त्यानं नेण्यात आलं होतं. त्याबद्दल मी प्रश्न विचारले होते,’ ‘मला वाटतं जे घडायचं होतं, ते घडले. जायचे ते लोक गेले. नवीन सरकार बसलं. सगळ्या गोष्टी घडल्या,’ अशा शब्दांत राज यांनी पुलवामातील हल्ल्यावर भाष्य केले.