Maharashtra

मला रश्मी वहिनींकडून अशा टीकेची अपेक्षा नाही – चंद्रकांत पाटील

By PCB Author

March 02, 2020

मुंबई,दि.२(पीसीबी) – सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे या कर्तृत्ववान आहेत. त्यांचं मी कौतुक केलं होतं. मला रश्मी वहिनींकडून अशा टीकेची अपेक्षा नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी सामनातून करण्यात आलेल्या टीकेला पाटलांनी प्रत्युत्तर दिलं.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली. यानंतर आज सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आम्हालाही टीका करता येते. मात्र कुणीही मर्यादा सोडू नये. मी अग्रलेख लिहित नाही असं रश्मी वहिनी म्हणत असतील तर संपादक का झालात? हा प्रश्न आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, असे अनेक दादामियां गोधड्या भिजवत होते तेव्हा शिवसेना हिंदुत्व आणि राष्ट्रकार्यासाठी छातीचा कोट करून लढत होती, असं म्हणत सामनाच्या चंद्रकांत पाटलांवर टीका करण्यात आली होती.