मला तीन लाखांचे लीड नाही मिळाले, तर समजून जावा – आझम खान  

0
433

लखनऊ,  दि. २२ (पीसीबी) –  रामपूर लोकसभा मतदारसंघातून माझा तीन लाखांच्या मताधिक्याने विजय झाला नाही, तर यंदाची निवडणूक पारदर्शी आणि मुक्त वातावरणात झाली नाही, यावर शिक्कामोर्तब होईल, असे समाजावादी पक्षाचे नेते आझम खान यांनी म्हटले आहे. 

आझम खान  आज (बुधवार)  प्रसारमाध्यमांशी  बोलत होते.  आपण रामपूर मतदारसंघातून  ३ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येऊ, असा विश्वास व्यक्त केला. तसे न घडल्यास ही निवडणूक पारदर्शीपणे पार पडली नाही, असे सिद्ध होईल, असे आझम खान  म्हणाले.

दरम्यान, आझम खान यांच्याविरोधात भाजपच्या जयाप्रदा  रिंगणात  आहेत. यामुळे ही लढत चुरशी झाली आहे. प्रचारादरम्यान जयाप्रदा यांच्याविषयी  वादग्रस्त विधान  केल्याने आझम खान  यांच्यावर  प्रचारबंदी घालण्यात आली होती.  जयाप्रदा या सपाच्या माजी खासदार  असून  त्यांनी  निवडणुकीआधी  भाजपमध्ये प्रवेश केला आहे.