Maharashtra

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे यांची निवड

By PCB Author

October 28, 2018

यवतमाळ, दि. २८ (पीसीबी) –  ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांची ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ढेरे यांच्या नावावर साहित्य महामंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला. काव्य, समीक्षण, ललित, वैचारिक अशा साहित्याच्या विविध क्षेत्रात अरुणा ढेरे यांनी मुशाफिरी केली आहे. लोकसंस्कृतीचा अभ्यास, हा त्यांच्या साहित्यप्रवासाचा केंदबिंदू ठरला आहे. 

९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमधील पोस्टल मैदानावर होणार आहे. ११, १२ आणि १३ जानेवारी २०१९ असे तीन दिवस साहित्याचा उत्सव यवतमाळमध्ये होणार आहे.

पहिल्यांदाच साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका झाल्या नाहीत. सर्वानुमते संमेलनाध्यक्षाची निवड करण्याचे साहित्य महामंडळाने ठरवले होते. त्यानुसार डॉ. अरुण ढेरे यांची एकमताने निवड करण्यात आली.