मराठा आरक्षणासंदर्भातील याचिका मुंबई उच्च् न्यायालयाने काढली निकाली     

0
445

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. त्यामुळे याचिकेचा मूळ हेतू साध्य झाला आहे, असे याचिकाकर्त्यांनी  न्यायालयात  सांगितले. तर राज्य सरकारने आरक्षणासंदर्भात कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती  उच्च न्यायालयाला  दिली. यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात दाखल झालेली याचिका मुंबई उच्च् न्यायालयाने आज ( बुधवारी)  निकाली काढली.