नागपूर, दि. २२ (पीसीबी) – सरकार कोणत्याही पक्षाचे येवो, सरकारी नोकऱ्यांची संख्या अत्यल्प राहणार आहे. तेव्हा उद्यमशील बना आणि नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे बना, असे आवाहन करून मराठा आरक्षणामुळे नोकऱ्या मिळतील, हा समज चुकीचा आहे, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.