औरंगाबाद, दि. ३० (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी (दि. ३१) संध्याकाळी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा. यासाठी मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने सरकारला सात प्रश्नांची सूची ईमेलद्वारे पाठवली आहे. या मागण्या मान्य झाल्यास समन्वय समितीच्या सदस्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यात येईल, असे समन्वयक विनोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.