मुंबई, दि. ९ (पीसीबी) – राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून वातावरण तापले आहे. सकल मराठा क्रांती मोर्चाने आज (गुरूवार) क्रांती दिनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद लाभला. पुणे, नाशिक, नांदेड याठिकाणी हिंसक वळण लागले. या पार्श्वभूमीवर मराठा मोर्चांवर प्रतिबंध घालून हिंसक आंदोलकांकडून नुकसान भरपाई घेण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर १३ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.