मराठा अारक्षणासाठी घटनादुरुस्ती करा; त्यासाठी विराेधकांना एकत्र अाणण्याची जबाबदारी माझी – शरद पवार

0
380

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – मराठा समाजाला अारक्षण देण्यासाठी घटनादुरुस्तीत बदल करण्याची अावश्यकता अाहे, परंतु सरकार एकटे निर्णय घेऊ शकत नाही. घटना बदल करण्याचा अधिकार फक्त संसदेला अाहे. त्यामुळे संसदेत जाऊन यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न अाहे. घटनादुरुस्तीतून मराठा समाजाला खुश करण्याचा प्रश्नच नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी केले. मराठा अारक्षणासाठी घटनादुरुस्ती करा, त्यासाठी सर्व विराेधकांना एकत्र अाणण्याची जबाबदारी मी उचलेन, अशी हमी शरद पवारांनी सरकारला दिली अाहे.