“मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे – राज ठाकरे

0
365

 

मुंबई, दि.४ (पीसीबी) – राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी इतकी शांतता आपण ९२-९३ च्या दंगलीतही पाहिली नव्हती असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांनी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करायला हवे होते असे म्हटले आहे.

लॉकडाउनची शिस्त पाळली जाणार नाही तर अर्थसंकट निर्माण होईल अशी भीती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

“मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांची वैद्यकीय तपासणी बंद करायला हवी. लोकांच्या अंगावर थुकतायत का, या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल हवेत. धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचले पाहिजे. लॉकडाउन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच,” असे राज ठाकरेंनी खडसावून सांगितले आहे.