ममता बॅनर्जींना जनता नमविल्याशिवाय राहणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस

0
421

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची सारी मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. जेव्हा साऱ्या सीमा संपतात, तेव्हा पतन अटळ असते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आता तेथील जनता नमविल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या रोडशो दरम्यान मंगळवारी वाहनांवर लाठ्या फेकण्यात आल्या तसेच जाळपोळ, दगडफेक करण्यात आली. त्याचबरोबर भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. या प्रकाराचा  मुख्यमंत्र्यांनी तीव्र निषेध केला .

तृणमूलचे कार्यकर्ते भाजप कार्यकर्त्यांवर चालून गेले.  या निवडणुकीत सर्वाधिक हिंसाचार हा पश्चिम बंगालमध्येच झाला. त्यामुळे ममता बॅनर्जींनी पराभवाचा किती धसका घेतला, हे स्पष्ट होते.  निवडणूक आयोगाने सुद्धा या सर्व प्रकारांची गांभीर्याने दखल घ्यावी आणि तेथील निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाययोजना कराव्यात, असे   फडणवीस यांनी  म्हटले आहे.