‘मन की बात’, सरकारी बात नाही, तर सर्व समाजाची बात – पंतप्रधान

0
478

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – ‘मन की बात’ सरकारी बात नाही, ही सर्व समाजाची बात आहे. ‘मन की बात’ महत्वाकांक्षी भारताची बात आहे. भारताचा आत्मा राजकारण नाही तर समाजनीती आणि समाजशक्ती आहे, ही ‘मन की बात’  १३० कोटी भारतीयांची आहे,  असे प्रतिपादन  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बा’ या कार्यक्रमात आज (रविवार)  केले.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आजची  ‘मन की बात’हा  कार्यक्रम विशेष  आहे. २०१४ साली सुरू झालेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा आज ५० वा भाग आहे. पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी हे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतात.

रेडिओ संवादाची तुलना कोणत्याही माध्यमाशी करता येणार नाही. रेडिओशी प्रत्येकजण जोडला गेला आहे. मला रेडिओच्या ताकदीचा अंदाज होता,  असे पंतप्रधान मोदी  यावेळी सांगितले.