पिंपरी, दि. २ (पीसीबी) – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडी करण्यात येणार आहे. त्यासाठी शेकाप, शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट) या पक्षांच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. तसेच मनसेला महाआघाडीत घेण्याबाबत विचार आहे. मात्र, त्याबाबतचा अंतिम निर्णय दोन्ही काँग्रेसचे वरिष्ठ नेते घेतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे सांगितले.