मनसेकडून पृथ्वी शॉच्या परिवाराला धमक्या; बिहारच्या काँग्रेस खासदाराचा आरोप

0
302

मुंबई, दि. १४ (पीसीबी)- मुंबईचा खेळाडू पृथ्वी शॉ सध्या विंडीजविरुद्धच्या मालिकेत आपले नाण खणखणीत वाजवून दाखवतो आहे. पहिल्या कसोटीत शतकी खेळी केल्यानंतर, दुसऱ्या सामन्यातही पृथ्वीने झुंजार अर्धशतक झळकावले. मात्र त्याच्या खेळीचे कौतुक करण्याऐवजी त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणावरुन राजकारण व्हायला सुरुवात झाली आहे. पृथ्वी शॉ हा मूळचा बिहारचा खेळाडू असून, त्याला आपली खरी ओळख सांगू नये म्हणून मनसेकडून धमक्या मिळत असल्याचा आरोप बिहारचे काँग्रेस खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहनीने यासंदर्भातले वृत्त दिलेले आहे.