भोपाळ , दि. २८ (पीसीबी) – मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सरकारचा पाठिंबा काढून घेण्यासाठी आपल्याला ५० ते ६० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा दावा मध्य प्रदेशातील बहुजन समाज पक्षाच्या आमदार रामबाई यांनी केला आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
रामबाई पुढे म्हणाल्या की, पाठिंबा काढून घेण्याच्या बदल्यात आपल्याला मंत्रिपदाचीही ऑफर देण्यात आली होती. भाजप नेते प्रत्येकाला पैशांची ऑफर देत आहेत. परंतु जे भाजपची ऑफर स्वीकारतील ते मूर्खच असतील. पैसाच आयुष्यात महत्त्वाचा नाही, असे त्या म्हणाल्या.
योग्य काय, अयोग्य काय हे आपल्याला पाहावे लागेल आणि भाजप अयोग्य आहे हे सत्य आहे, असे रामबाई म्हणाल्या. माझ्यासाठी मंत्रिपद आणि पैशाला फार महत्त्व नाही. कमलनाथ सरकार टिकले पाहिजे, अशीही ठाम भूमिका त्यांनी मांडली.