नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – आगामी निवडणुकीमध्ये इव्हीएमवर मतदान घेण्यापेक्षा मतपत्रिकेवर मतदान घेण्यात यावे, अशी मागणी काँग्रेससह काही राजकीय पक्षांनी केली. त्यावर मतपत्रिकेवर मतदान घेणे योग्य ठरणार नाही. कारण पुन्हा मतदानकेंद्र बळकावली जाण्याचे सत्र सुरू होईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांनी सांगितले.