‘मजबूत इच्छाशक्ती’मुळे मोदी इतर नेत्यांपेक्षा वेगळे- अमित शहा

0
564

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – ”स्वातंत्र्यानंतर देशाने १७ लोकसभा निवडणुका पाहिल्या, २२ सरकार आणि १५ पंतप्रधान पाहिले. प्रत्येक पंतप्रधानाने आपापल्या परीने देशाच्या विकासात योगदान दिले. मात्र, एका गुणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इतर नेत्यांपेक्षा वेगळे ठरतात, तो गुण म्हणजे त्यांची मजबूत इच्छाशक्ती”

हे निरीक्षण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वात विश्वासू सहकारी व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे. एका वृत्तवाहिनीने लिहिलेल्या लेखात शहा यांनी हे नमूद केले आहे. काँग्रेसने तब्बल ५५ वर्षे या देशावर राज्य केले. पूर्ण बहुमतासह त्यांना आठ संधी मिळाल्या. मात्र, देशाचे भाग्य बदलणारे किंवा व्यापक परिवर्तन घडवणारे १० निर्णय देखील काँग्रेस घेऊ शकली नाही. अटलबिहारी वाजपेयी यांनी परिस्थिती बदलण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न केले. मात्र, बहुमताअभावी त्यांना ते शक्य झाले नाही,’ असे शहा यांनी म्हटले आहे.

२०१४ नंतर मोदी सरकारनं परिवर्तनाची व्याख्याच बदलून टाकली आहे. गेल्या ६३ महिन्यांत मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचा सर्वसामान्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झालाच, पण देशाच्या विकासातही भर घातली. मजबूत इच्छाशक्ती हीच मोदींची ओळख आहे. त्यामुळेच राजकीय विरोध असताना आणि राज्यसभेत बहुमत नसतानाही त्यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केले. नोटाबंदी, जीएसटी, तीन तलाक, एअर स्ट्राइक, सर्जिकल स्ट्राइक, वन रँक वन पेन्शन, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, यूएपीए कायद्यात बदल, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा असे आतापर्यंत अशक्य समजले जाणारे निर्णय घेतले, याकडे शहा यांनी लेखातून लक्ष वेधले आहे.