नाशिक, दि. १९ (पीसीबी) – मंत्री तुमच्या मागण्या ऐकत नसतील, तर त्यांना कांदे फेकून मारा, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. नाशिक दौऱ्यावर असलेले राज ठाकरे यांनी कळवणमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी राज बोलत होते.
कळवणमध्ये कांदा उत्पादक शेतकरी, स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी आणि राज ठाकरे यांची बैठक झाली. त्यावेळी शेतकऱ्यांनी मंत्री आपले म्हणणं ऐकून घेत नसल्याचे राज ठाकरेंना सांगितले. त्यावर, मंत्री तुमच्या मागण्या ऐकत नसतील, तर त्यांना कांदे फेकून मारा, असा सल्ला राज ठाकरेंनी दिला.
राज ठाकरे कालपासून नाशिक दौऱ्यावर असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिकच्या दिंडोरी भागात आज सकाळी राज ठाकरे आले असता त्यांच्या स्वागतासाठी तरुणांची मोठी गर्दी जमा झाली होती. यावेळी ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरेंचे स्वागत करण्यात आले.