“मंदीमुळे लोक भूक-भूक करत रस्त्यावर येतील, त्यांनाही गोळ्या घालणार का?”

0
452

मुंबई, दि.६ (पीसीबी) – मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्थेचा विकास मंदावला आहे, अशी टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली. मनमोहन सिंग यांनी केलेल्या टीकेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही समर्थन दर्शवलं आहे.

कलम हटवून सरकारने धाडसी पाऊल टाकलं व देश त्याबद्दल आनंदी आहे. कश्मीरात विद्रोही रस्त्यांवर उतरले तर त्यांना बंदुकांच्या जोरावर मागे रेटता येईल, पण आर्थिक मंदीवर बंदुका कशा रोखणार. मंदीमुळे बेरोजगारी उसळेल व लोक ‘भूक भूक’ करत रस्त्यावर येतील तेव्हा त्यांनाही गोळ्या घालणार का?,असं म्हणत शिवसेनेनं सामनामधून सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

आर्थिक मंदीवर भक्तांनी कितीही उलटं सुलटं सांगितलं तरी सत्याचा कोंबडा आरवलाय आणि मौनीबाबा डॉ. मनमोहन सिंग यांनी सौम्य शब्दांत सांगितलेल्या सत्याचाही स्फोट झालाच आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.