Maharashtra

भ्रष्टाचाराचे आरोप असणारे भाजपमध्ये गेल्यास पवित्र

By PCB Author

August 21, 2019

जालना, दि. २१ (पीसीबी) – जेव्हा आमच्या पक्षात होते तेव्हा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप कराचे आणि त्याच्या भाजपात प्रवेश केल्यावर त्यांना पवित्र करुन घ्यायचे, असे भाजपचे धोरण असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जालना जिल्ह्य़ातील भोकरदन आणि बदनापूर येथे शिवस्वराज्य यात्रेच्या आगमनाच्या वेळी जाहीर सभांमध्ये केली.

पवार म्हणाले, की भूलथापा मारून सत्तेवर आलेल्या सरकारला जनतेच्या प्रश्नांशी देणेघेणे नाही. या सरकारच्या काळात राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु सरकारला त्याचे गांभीर्य नाही. कोल्हापूर–सांगली भागात महापूर आल्यावर तेथे भेट देण्यास मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांना चार दिवसांचा वेळ लागला.