भीमा कोरेगांव प्रकरण; ‘त्या’ पाच जणांच्या नजरकैदेवर सोमवारी निकाल  

0
408

पुणे,  दि. २० (पीसीबी) – भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणातील पाच जणांची नजरकैद कायम आहे. आता याबाबत सोमवारी (दि. २४) सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे.  या पाच जणांच्या सुटकेसाठी याचिका दाखल केली आहे, तर त्यांच्या अटकेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. मात्र, पुणे पोलिसांनी त्याला विरोध करत   अटकेतील लोक हिंसा भडकवण्याच्या कटात सहभागी होते, असा दावा केला होता.