Desh

भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात मोठे नुकसान; जैश-ए-मोहम्मदची कबुली

By PCB Author

March 03, 2019

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) –  पाकव्याप्त काश्मीरमध्ये  जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हल्ला झाला आहे, अशी कबुली  जैश संघटनेचा  म्होरक्या मसूद अझहरचा  भाऊ मौलाना अम्मरने एका ध्वनिफितीच्या माध्यमातून दिली आहे.

भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात जैशचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणी जिहादची शिकवण दिली जायची, अशी ठिकाणे या हल्ल्यात उद्‌ध्वस्त करण्यात आली आहेत. या ठिकाणांची     पुनर्बांधणी करुन ही प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत, असे या ध्वनीफितीत म्हटले  आहे

या हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्याचे आवाहन मौलाना अम्मरने  दहशतवाद्यांना केले आहे. दरम्यान, मौलाना अम्मरची ही ध्वनिफितीतून  बालाकोटमध्ये दहशतवदी तळांवर भारताने केलेल्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे कंबरडे मोडल्याचे सिध्द झाले आहे.